टीम लोकमन मंगळवेढा |
पाणी हे अमूल्य जीवन आहे पण आजच्या काळात देखील पाणी कोणीही वाचवत नाही सर्व सजीव सृष्टीला पाण्याची फार आवश्यकता आहे. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे म्हणून जागतिक जलदिनाचे औचित्य साधून मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबने मंगळवेढा-माचणूर-मंगळवेढा 30 किलोमीटर सायकल रॅली काढून पाणी बचावचा नारा देत जनजागृती केली.
सद्या ऐन उन्हाळ्यात लोक पाणी भरून गरज नसताना देखील नळ चालूच ठेवतात बऱ्याच ठिकाणी पाणी सुरू करून कपडे धुतले जातात, भांडी स्वच्छ केले जातात, अंघोळीसाठी शॉवरचा वापर करतात, पाईप सुरु ठेवून गाडी धुतात त्यामुळे खूप पाणी वाया जाते आणि दुसरीकडे पाण्याच्या अभावी उन्हाळ्यात तहानलेले प्राणी, पक्षी मरण पावतात पाणी हा आपल्या जगण्याचा आधार आहे याला वाचविण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार म्हणूनच सायकल रॅलीतून पाणी अडवा पाणी जिरवा, तुम्ही पाणी वाचवा पाणी तुम्हांला वाचवेल, जल है तो कल है, पाणी वाचवा जीवन वाचवा, नदी स्वच्छ ठेवा पर्यावरनाचे रक्षण करा. असा नारा देत जनजागृती केली.
तसेच सर्वत्र कडक उन्हाळा जाणवू लागला आहे त्यामुळे मानवाबरोबर पशु पक्षांना उन्हाच्या झळा असह्य हाऊ लागल्या आहेत त्यामुळे घरट्यातील पिल्ले पाण्यावाचून जीव सोडीत आहेत. पाण्यासाठी पक्षांना दूरवरती भटकावे लागत आहे. वाढत्या उन्हात पक्षांच्या संवर्धनासाठी पक्षीप्रेमी व नागरिकांनी घराच्या अंगणात, झाडावरती, गच्चीवरती किंवा जिथे शक्य असेल तिथे पक्षांना पाणी आणि चारा ठेवून पक्षी संवर्धनासाठी हातभार लावावा असे आवाहन देखील माचणूरच्या रॅलीत लोकांना करण्यात आले.
तसेच सायकल चालवा इंधनाची बचत करा, नदीची स्वच्छता ठेवा व पर्यावरणाचे रक्षण करा असा प्रबोधनाचा जागर घालण्यात आला खरोखरचं वारी परिवार सायकल क्लबने हाती घेतलेल्या पाणी व पक्षी बचाव उपक्रमाचे सर्वस्तरातून विशेष कौतुक होत आहे. यावेळी जनजागृती रॅलीत सायकल क्लबचे अध्यक्ष स्वप्निल टेकाळे, रुजुता शहा, रिदम शहा, राहुल सांवंजी, अविनाश जाधव, प्रफुल्ल सोमदळे, सचिन साळुंखे, गणेश मोरे, सिद्धेश्वर डोंगरे, प्रा. महेश अलिगावे, भारत नागणे, यश महामुनी, समर्थ महामुनी, डॉ. राहुल शेजाळ, रतिलाल दत्तू, नागेश डोंगरे, दत्ता जाधव, चंद्रजीत शहा, नंदकुमार नागणे, कमलेश माळी, चंद्रकांत चेळेकर, प्रा. विनायक कलुबर्मे आदी सहभागी होते. यावेळी दत्तात्रय आसबे यांचे विशेष सहकार्य लाभले.







