टीम लोकमन मंगळवेढा |
करवीर नगरी कोल्हापूर शहरातील एका भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शहरातील सायबर चौकात हा अपघात घडला आहे. या अपघातात कारने चौघांना चिरडल्याची माहिती मिळत आहे.
यात कार चालकासह तिघे ठार झाले असून पाचजण जखमी झाले आहेत. या अपघातात तीन दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झाल्याचं समोर येत आहे. झालेल्या या अपघातामुळे चौकात वाहतुकींची मोठी कोंडी झाली होती.
नेमका अपघात कसा घडला?
शहरातील सायबर चौकात दुपारच्या सुमारास काही लोक दुचाकीवरुन रस्ता ओलांडत होते. यावेळी सर्व वाहनांचा वेग कमी होता. प्रत्येकजण जागा मिळेल तशी वाहने पुढे नते होते. इतक्यात एका भरधाव वेगाने आलेल्या कारने दोनतीन दुचाकींना जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील लोक काही फूट फेकले गेले. जोराची धडक बसल्याने काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात एक चिमुरडी वाचल्याचे पाहायला मिळाले.
अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मात्र, तिघांना मृत घोषित करण्यात आले आहे. राजारामपुरी पोलीस आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
वसंत चव्हाण (वय 72) असे मृत्यू झालेल्या कारचालकाचे नाव आहे. त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. चव्हाण यांना काही आजार होता का? याची चौकशी त्यांच्या कुटुंबीयांकडून आता पोलीस करत आहेत. मयत कारचालक वसंत चव्हाण हे शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त प्रभारी कुलगुरू होते. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू व्ही. एम. चव्हाण यांचा देखील या अपघातात मृत्यू झाला. व्ही. एम. चव्हाण तब्येत बरी नसतानाही कार चालवत असल्याची माहिती समोर येत आहे.









