टीम लोकमन मंगळवेढा |
राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच आहे. हवामान विभागाकडून पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून राज्यभरात व्यापला आहे. मात्र गेले काही दिवस पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. आता मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून राज्यातील विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाने दडी मारली असली तरी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पडणाऱ्या सरींमुळे शेतकरी सुखावून जात आहे. पावसातील खंडामुळे राज्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आज (ता. २७) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, तर विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आज मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्ये पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल. विदर्भ, मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर









