टीम लोकमन मंगळवेढा |
संपूर्ण महाराष्ट्रभर ३१ मे ते २६ जूलै या कालावधीत महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी व महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रहारने ‘झाले मतदान भरल्या मतपेट्या, आता करुया रक्तदान, कारण रिकाम्या आहेत रक्तपेढ्या’ ही मोहीम संपूर्ण राज्यभर हाती घेतली आहे.
प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातुन महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातुन प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग संघटनेच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के-पाटील, जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील व प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्राय्या माळी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार जनशक्ती पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष राकेश पाटील व प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांच्या नेतृत्वाखाली १०६ रक्तदात्यांनी रक्तदान करून बच्चुभाऊ यांच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के-पाटील यांनी बच्चुभाऊच्या आवाहनाला सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
सदर रक्तदान शिबिरावेळी माजी सैनिक संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष मल्लय्या स्वामी मेजर, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे संचालक मेजर चंगेजखान इनामदार, कृषिराज परिवाराचे प्रमुख युवराज शिंदे, प्रहार अपंग संघटनेचे तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, प्रहार अपंग संघटनेचे संपर्कप्रमुख शकिल खाटीक, प्रहार अपंग संघटनेच्या महिला शहराध्यक्ष सौ. सविता सुरवसे, अरुणा घाडगे, शबाना मकानदार, रुपाली शिंदे, शिवानंद नराळे, सर्जेराव पाराध्ये, राम मेटकरी, अंकुश सकट, राहुल खांडेकर, तानाजी पवार, सोमनाथ हेगडे, रुक्मिणी कोकरे तसेच माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, उद्योगपती हणमंत दुधाळ, अजिंक्य मजूर संस्थेचे चेअरमन तन्वीर मुलाणी यांनी भेट दिली.










